Tuesday, November 13, 2012

सूर असे कसे लागतात जाऊन.....

सूर असे कसे लागतात जाऊन

आतपर्यंतं....अगदि भिडतात काळजाला....अंगावर काटा....डोळयात आसू...गालावर
हसू...मनात नाचू... अशी विचित्र अवस्था का बरं होते...काय काय करतात हे सूर कळत
नाही...छळतात म्हणावं तर तसंही नाही...लाड करतात म्हणावं तर तेही नाही...प्रेम
करतात का तर नाही...नक्की कय करतात हे सूर ...


अगदी मनावर गारूड
करतात...गात्रागात्रामधे सूक्ष्मतीसूक्ष्म असे तरंग उमटत जातात...उमटतंच
जातात...काही सुधरत नाही..आपण वेड्यासारखे होतो...एखादा कातर स्वर काळीज कापून आर
पार जातो....मधूनचं एखादी लाडीक तान अगदी झोपाळा जोजवून जाते...एखादा करूण स्वर
पाणि नाही खळू देत डोळ्यातलं...तर एखादी आर्त तान आतूरतेच्या परिसीमेला नेऊन
पोचवते....


कधी कधी आपण आपले रहातच
नाही..होतो एक हलका हवेचा झोत...एक खळाळणारं पाणी...एक डोलणारं झाड...एक फुलांनी
डवरलेला वेल...एक धीरगंभीर पर्वत...एक नाजूक पाऊलवाट वळणावळणाची...होतो मेघ आणि
लागतो शोधू आपल्या प्रीयेला...आपण असतो अन नसतोही...


का करतात हे स्वर
आपल्यासोबत असं..का नाही सोडत एकटे आपल्याला...की त्यानाही कळतं आपण उदास असल्याचं
अन देतात ते साथ उदासीतही....


हे सूर नव्हे असतात
फुलपाखरं भोवताली रंगीत ...असतात भ्रमर गुंजन करणारे.....कधी होतात विकारी न्
विखारीही....तर कधि वैरागी निर्विकार...कधी येतात सजून धजून भेटायला प्रियाला...तर
कधी लावतात वाट पहायला प्रियेची...कधी भंगून टाकतात सारी स्वप्ने...तर कधी सांगतात
मर्म उद्याच्या भविष्याचं..


का कसे कुणास ठाऊक करतात
साथ सदैव आपली सावलीसारखी हे सूर...या त्यांच्या अशा त-हांनी आपण अचंबित होतो...कसल्याशा
सुरुवातीला कधी मध्येच तर कधी शेवटाला येतात विचारांच्या...सूर आले की विचार येतात
का विचार आले की सूर साथ देतात त्यांना हे एक कोडं आहे...अन् असली कोडी
सोडविण्याच्या भानगडीत न पडता घ्यावं त्यांना सरळ आपलसं करून...खेळवावं त्यांना...करू
द्यावं प्रेम आपल्यावर..अन् रुसूही द्यावं...कारण हे सूरच असतात आपले सांगाती...


तेच असता माय् अन्
बाप्...बंधू न् मित्र...सखी अन् प्रेयसी पण...करतात साथ घेतात हात हाती...स्पर्षून्
जातात हल्केच...अन दाखवतात सदैव वाट आयुष्यात...जाणवू लागतं कि आहेत हे आपल्या
विचारांचं प्रकटीकरण आपलंच रूप आरश्यातलं...


आयुष्यच होऊन जाईल एक ...सूरेल मैफील.....

No comments:

Post a Comment