रचना हा असा शब्द आहे...रचणे..आणि रचतानाच त्याच्या कलात्मकतेचे भान ठेवणे दोनही चे भान ठेवावे लागते...
घाई केली तर कलात्मकता बिघडण्याचा धोका ...
आणि रचताना एक एक विट परखून घेतली नाही तर ढाचा लेचापेचा होण्याची शक्यता...
त्यामुळेच काळ काम वेग यासोबत अजून एक गोष्ट महत्वाची असते ती म्हणजे संवेदंशीलता...मग रचना कोणतीही असो..एक एक धागा विणत बनलेले वस्त्र असो...की एक एक वीट रचत जमलेली वास्तू...एक एक रंग शोधत चितारलेले चित्र वा एक एक सुर गुंफत जमलेली सुरेल सुरावट..
एक एका शब्दांची काव्यत्म पखरण किंवा चव अन सुगंध ओळखत जमलेला एखादा झकास पदार्थ..
हळूवार फुंकरीच्या द्वारे बनलेले काचशिल्प वा घण घण घाव घालत केलेले धातूकाम...
संगणकीय कळींच्या द्वारे बनलेली एखादी चित्र्फीत अथवा सुंदर कळ्यांचा गुंफलेला सुंदर गजरा...
जर या अशा सर्व कलात्मकतेला गरज असते संवेदनांची...
तर अशाच सुंदर समाजाची रचना का बरे आपण बळजोरीने करू असे आपल्याला वाटते..
जर असेच संवेदंशील बनलो आपण आणि सुरू केली रचना...
दोरा हळूवार गुंफला विचारांचा त्याचा फास बसू न देता...तापविले वातवरण फक्त थोड्या लवचिकते पुरतेच त्याची धग जाणवू देता...हलकेच चितारले चित्र छोट्या सहज साध्य बदलांचे पूर्ण कागदच रेषांच्या ताकदीने फाटू न देता..अन हे सर्व केले जर काळ काम वेगाचे योग्य भान ठेवत आणि सगळ्यांच्या संवेदना जपत ..तर नाही का होणार एक आदर्श समाजरचना सहज शक्य...तुम्ही म्हणाल हे तर स्वप्नरंजन झाले..पण एक सांगा रचना करायची तर आधी डोळ्यासमोर स्वप्नातील चित्र आकार घेतेच ना आणि मगच करतो ना आपण ते प्रत्यक्षात साकार? मग काय हरकत आहे आपण प्रत्येकाने असे संवेदंशील व्हायला ..आपले विचार अल्लद इतरांच्या विचारात सामावून गुंफायला...मग ठरवूच आपण की असाच एक समाज रचणारोत आपण आजूबाजूला...ज्याची बनेल एक सुंदर रचना आणि अशाच अनेक रचनांचा असेल आपला देश एक कलात्म सृजनशील आनंदी देश...
श्री...April 25 2016
घाई केली तर कलात्मकता बिघडण्याचा धोका ...
आणि रचताना एक एक विट परखून घेतली नाही तर ढाचा लेचापेचा होण्याची शक्यता...
त्यामुळेच काळ काम वेग यासोबत अजून एक गोष्ट महत्वाची असते ती म्हणजे संवेदंशीलता...मग रचना कोणतीही असो..एक एक धागा विणत बनलेले वस्त्र असो...की एक एक वीट रचत जमलेली वास्तू...एक एक रंग शोधत चितारलेले चित्र वा एक एक सुर गुंफत जमलेली सुरेल सुरावट..
एक एका शब्दांची काव्यत्म पखरण किंवा चव अन सुगंध ओळखत जमलेला एखादा झकास पदार्थ..
हळूवार फुंकरीच्या द्वारे बनलेले काचशिल्प वा घण घण घाव घालत केलेले धातूकाम...
संगणकीय कळींच्या द्वारे बनलेली एखादी चित्र्फीत अथवा सुंदर कळ्यांचा गुंफलेला सुंदर गजरा...
जर या अशा सर्व कलात्मकतेला गरज असते संवेदनांची...
तर अशाच सुंदर समाजाची रचना का बरे आपण बळजोरीने करू असे आपल्याला वाटते..
जर असेच संवेदंशील बनलो आपण आणि सुरू केली रचना...
दोरा हळूवार गुंफला विचारांचा त्याचा फास बसू न देता...तापविले वातवरण फक्त थोड्या लवचिकते पुरतेच त्याची धग जाणवू देता...हलकेच चितारले चित्र छोट्या सहज साध्य बदलांचे पूर्ण कागदच रेषांच्या ताकदीने फाटू न देता..अन हे सर्व केले जर काळ काम वेगाचे योग्य भान ठेवत आणि सगळ्यांच्या संवेदना जपत ..तर नाही का होणार एक आदर्श समाजरचना सहज शक्य...तुम्ही म्हणाल हे तर स्वप्नरंजन झाले..पण एक सांगा रचना करायची तर आधी डोळ्यासमोर स्वप्नातील चित्र आकार घेतेच ना आणि मगच करतो ना आपण ते प्रत्यक्षात साकार? मग काय हरकत आहे आपण प्रत्येकाने असे संवेदंशील व्हायला ..आपले विचार अल्लद इतरांच्या विचारात सामावून गुंफायला...मग ठरवूच आपण की असाच एक समाज रचणारोत आपण आजूबाजूला...ज्याची बनेल एक सुंदर रचना आणि अशाच अनेक रचनांचा असेल आपला देश एक कलात्म सृजनशील आनंदी देश...
श्री...April 25 2016
No comments:
Post a Comment