
एखादा प्रसंग घडला आयुष्यात...खुप आनंदलो आपण की....डोळ्यातून दोन मोती ओघळतात...असेच दोन दोन बिंदूंची साठवण ...होतो आनंदाचा डॊह...
लहानपणी अगदी एखादा खाऊ, खेळणे वगैरे अगदी आपल्याला हव्वे तसे मिळाले तरी डोळे चमकतात...हि चमक म्हणजे ते मोती...साठवणीची सुरूवात..
आपल्यावर सारखं राज्य येतं...किंवा पत्त्यात आपणअच गाढव होत असतो अनेक डाव ...अचानक आपण सुटतो...जमतात ना दोन मोती..
शाळेत एखादं उत्तर आपण पट्कन देतो..पहिला येणाराहि न देउ शकलेल्या प्रश्नाचं...अचानक जाहिर कौतुक होत...पाठीवर कौतुकाची थाप...अजून दोन...
मैदानात सामना चालू आहे...आपण भले प्रेक्षक असतो...आपला आवडता संघ संकटात...हरतोय वाटता वाटता....जिंकतो आपलाच विश्वास नाही बसत...पण तही जेव्हा बसतो आपण लागतो नाचू...अन ते दोन लगता देउ साथ आपल्या गालांवर...
शाळेचं नाटक...आपली भूमिका म्हटलं तर महत्वाची ..म्हटलं तर नाही...नाटक संपतं...आपण बाहेर मुलांमधे येतो...आपल्याला आवडणारी पण कधी साध बोलण्याची हिम्मत नसणारी एक वर्गमैत्रिण सामोर येते नुस्तं खुणेनेच छान झालं हं...आपण स्तब्ध....ते दोन मात्रं प्रवाही...
मग कधीमधी मित्राशी भांडण होतं...रोज बोलणारे कायम एकत्र राहाणारे बोलत नाहीत...कळतय पण मी कि तो आधी यात वेळ जातोय...मग आपणच जातो सरळ नुसते पहातो आणि एकदम दोघेही म्हणतात जाउदे...गळामिठी न एकमेकांच्या खांद्यावर ते दोन दोन...
अचानक बाजारात आई आपण आणि भाऊ जात असतो....बोलता बोलता मागे पहातो तर भाऊ गायब...कुठे गेला कसा गेला...आपण आईला सांगतो...ती तर भेदरतेच...इकडे तिकडे पाहताना कळतं हे महाशय एका दुकानाच्या काचेतून आतली दुनीया पहाण्यात मग्न...आपन धावत जातो आईपण येते....पटकन त्याचा हात धरतो घट्ट...त्याला कळत नाही आई अन दादा का रडतात...ते दोन असतात ना सोबत..
एक ना अनेक बालपणी असे दोन कीत्येक वेळा साठत जातात...नाटक पाहाताना तो राक्षस मेला कि आनंद...बैलगाडीत गाडीवानाच्या शेजारी अन बसमधे खिड्कीची जागा मिळाल्याचा आनंद...सायकल पळविताना पायड्ल न मारता काही अंतर पहिल्यांदा जाणे...क्रिकेट्चा चेंडु एकाद्या रागीट काकांच्या आवारातू त्याना समजू न देता हलकेच काढून आणणे...गावी करवंदीच्या जाळीत शिरुन पोटभर करवंदं खाऊन वर पानाच्या द्रोणात भरून आईला आणून देताना तीच्या नजरेत ....आजोबांना पान लावून त्याचा वीडा कुटून त्यातला लाल रस ओठाना लावून लालचुटूक करण्यातला आनंद
जसे आपण मोठे होत जातो...ते दोन मोती बाहेर येण्याची वारंवारता कमी होतेय असं वाटू लागतं. ते तसं नसतं....आपणच त्याना आता नको लोक काय म्हणतील वगैरे म्हणत अडवतो...मला सांगा नाही का येत हो आनंदाश्रू अनेक प्रसंगात...प्रेमाला छान प्रतिसाद मिळाला तेव्हा.....पहिला स्वकमाईच्या पगार आला तेव्हा.....एखाद्या आवडत्या व्यक्तीला अचानक भेटला तेव्हा....आपलं पहिलं वाहन पहिलं घर एवढं कशाला अगदी पहिलं वहिलं घेतलेलं एखादं घड्याळ....आलेच होते ना हो ते दोन मोती प्रत्येक वेळी...
प्रसंग बद्लतात....मायनेहि बदलतात पण त्या मोत्यांचा साठा होतच जातो....आणि त्याच मोत्यांचा होतो आनंदाचा डोह...त्या आनंदाच्या डोहावर तरंगण्यात खूप सुखावतो आपण...
आज हे सगळं आठवण्य़ाला कारण ठरलं एका कार्यशाळेचं...
कर्ण बधीर मुलांमधे घेतलेल्या....जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो तेव्हाच त्या मुलांच्या डोळ्यातील आनंद आणि कुतुहल सारं सांगून गेलं.
आपला प्रत्येकाचा असा एक आनंदाचा डोह असतो.
कधीकधी याच आनंदाच्या डोहात तरंगताना अचानक आपल्याला बुड्ल्याचा भास हौउ लागतो. नाका तोंडात पाणि शिरतंय जीव गुदमरतोय असं वाटू लागतं. का घडत असाव असं?
एक तर जसं की आपली वाढत जाणारी अपेक्षा....किंवा आपल्याकडून असणारी अपेक्षा पुर्ण न करता येण्याची खंत...
ते दोन ट्पोर रहातात बाजूला न फ़ुटू लागतो बांध आपला....सुरू होते शांत डोहात हालचाल...उमटू लागतात गोलाकार वर्तुळं चिंतेची....भितीची....संकटांच्या चाहूली अन सावल्या नाचू लागतात...
याचं खरं कारण असतो आपणच...
आता या घटना आठवा..
आपण कुठून यशस्वी होउन येतो...आपल्या माणसांना सांगतो...ते आपल्याला हवे तसे नाही कौतुक करत आपलं..दुखावतो आपण..अन वाहतात आपले डोळे...
एखादी घटना आपल्याला अप्रिय घडून गेलेली...कधी बोलत असताना कुणाशी आठवण केल्यासारखा विषय निघतो...आपली खपली निघते..अन...
कुठे तरी चाल्लोय आनंदाने...रस्त्यात गाडी बिघडते...सगळे आपल्याव्रर बिघडतात....आपण प्रयत्न करतो समजावण्याचा...पण नाही...आपण जरा बाजूला जातो...अन...
असे प्रसंग असतात घडत...आणि आपणही असेच काहिसे असतो त्यावर खंतावत...अनेकदा हळू हळू असे हौउ लागते कि आपण प्रत्येक घटनेत आपल्याला किंवा इतराना दोषी मानू लागतो.
आनंदाचा डोह बनू लागतो दुःखाची गर्ता....
असतो आपण त्याच ठिकाणी घटनाही त्याच...पण ....हा पण खूप मह्त्वाचा....
त्या वर्तुळाकार गर्तेचा भोवरा नक्कीच नेणार तळाला...गुदमरणार जीव..होणार घुसमट...आणि फ़क्त आपणच त्यात बुडत जाणारे.....
ह्या आनंदाच्या डोहाच दुःखाच्या गर्तेत कधी रुपांतर होतं नाही कळत आपल्याला...
खरंच नाही का कळत की येत असतात संकेत आपल्याला...
आठवा कधी शेवट्चे पहिल्या पावसात भिजलात ....कधी शेवट्च्या रेघोट्या मारल्या भिंतीवर वा कागदावर....कधी शेवटचं मनापासून व्यक्त झालात आपल्या माणसांपाशी मोकळेपणाने....कधी शेवट्चे भट्कलात निरुद्देश ...कधी शेवट्चे तासनतास बसलात पाण्याकाठी...नाही ना आठवत.???????
म्हणजे मोठ्या प्रगतीच्या मागे धावताना छोटे आनंद हरवले ना....आपल्याच अपेक्षांच्या वाढलेल्या आकारात हरवतोय ना आपण.....मग मग मग....ते दोन टपोर येऊ पाहणारे ...येऊ द्या त्यांना खुषाल....करा मन मोकळं ...व्हा व्यक्तं ...हे व्यक्तं होणं म्हणजेच आपलं आपण असणं...पहा बरं करून आणि मग बघा परत एकदा तरंगू लागाल तुम्ही आनंदाच्या डोहात शांत निवांत...स्वच्छंदी अन आनंदी...
म्हट्लय ना आनंदाचे डोही आनंद तरंग...आनंदची अंग आनंदाचे..
No comments:
Post a Comment